लातूर : खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून कापसाचे दर वाढत आहेत. कापूस उत्पादकांना चांगलाच फायदा झाला. चांगले उत्पादन व उत्पन्नही काढू शकले. सध्या कापसाचे आणखी दर वाढतील अशी शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.
यावर्षी पावसाचा सर्वात जास्त परिणाम कापूस पिकांवर झाला होता. हवामान बदलामध्ये सोयाबीन नेमका सापडल, कापूस उत्पादनात प्रचंड घट झाली होती. यावर्षी दरवर्षीपेक्षा कापूस उत्पादनात घट होती. या कारणाने कापसाला चांगला दर मिळाला. कपाशीची पाच वर्षाची उत्पादकता हेक्टरी 3 क्विंटल 60 किलो एवढी होती. वातावरणातील बदल आणि बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात तब्बल 2 क्विंटलची घट झाली असल्याची माहिती दिली. पावसामुळे कापूस पिकावर हा परिणाम झाला असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
कापसाचे दर चांगले राहिले त्यामुळे येणाऱ्या काळात कापसाचे क्षेत्र वाढणार अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. पीक विमा कंपनीकडून मागच्या ५ वर्षातील उत्पादकता तपासली जाते. यामध्ये गेल्या पाच वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत यंदाचे उत्पादन कमी असेल तर नुकसानभरपाई दिली जाते.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
