Share

बोगस जमातींचे अखेरचे मुक्तीस्थान म्हणजे काँग्रेस-अतुल भातखळकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जेएनयू विद्यार्थी संघटनेचे नेते कन्हैया कुमार आणि गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी हे २ ऑक्टोबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणात आहेत. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. तमाम डावे, कट्टरवादी, लिबरल, जातवादी आदी बोगस जमातींचे अखेरचे मुक्तीस्थान हे काँग्रेस आहे. अशी टीका केली आहे.

कन्हैया कुमार आणि जग्नेश मेवानी हे २ ऑक्टोबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसने कन्हैया कुमार आणि जिग्नेश मवानी यांना उमेदवारी न देत विधानसभा निवडणुकीत मदत केली होती. मात्र काँग्रेसला या विधानसभा निवडणुकीत थोड्याच जागांवर समाधान मानावो लागले. आता काँग्रेस या दोघांना सोबत घेत नवा डाव टाकणार आहे. कन्हैया कुमारमुळे काँग्रेसला बिहारमध्ये सावरण्याची चांगली संधी मिळू शकते असे अनेक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

या प्रवेशावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर टीका केली आहे. भातखळकर म्हणाले,
‘काँग्रेसची बी टीम आता अधिकृतपणे काँग्रेसमध्ये दाखल होणार? तमाम डावे, कट्टरवादी, लिबरल, जातवादी आदी बोगस जमातींचे अखेरचे मुक्ती स्थान हे काँग्रेसच आहे.’ अशी टीका भातखळकरांनी काँग्रेसवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!