Share

ओला दुष्काळ जाहीर करण्याचा विचार सुरु- विजय वडेट्टीवार

Published On: 

मुंबई : गुलाब चक्रिवादळाच्या प्रभावामुळे संपूर्ण कहाराष्ट्रात पाऊस झाला. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करायचा कि संपूर्ण राज्यात करायचा याचा विचार सुरु आहे. पावसाने झालेल्या नुकसानीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

पत्रकारांशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले, शेतकरी संकटात सापडल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार या दोघांनीही मदतीची भूमिका घ्यायची असते. यंदा प्रचंड पाऊस, वादळ आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे, असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मराठवाड्यातील ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पाऊस ओसरला की १०० टक्के पंचनामे पूर्ण होतील. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील नुकसानीची माहिती गोळ्या झाल्यानंतर दुष्काळाबाबत निर्णय होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

१७ लाख हेक्टरचे नुकसान

शेतकरी संकटात आला की सर्वच पक्षाची शेतकऱ्यांना मदतीची मागणी असते. मराठवाड्यात १७ लाख हेक्टरचं नुकसान झाल्याची माहिती आहे. त्याहीपेक्षा अधिक नुकसान झालेले असू शकते, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी महापुराचे कारण जलयुक्त शिवार असल्याचे म्हंटले होते,  त्यावरही वडेट्टीवार म्हणाले, अतुल देऊळगावकर तज्ज्ञ आहेत. त्यांची मत काय आहेत त्यावर विचार होईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!