Share

राजकीय हेतूने प्रेरित होऊन निर्णय घेणा-या राज्यपालांनी राजीनामा द्यावा – अशोक चव्हाण

Published On: 

मुंबई : आदर्श घोटाळा प्रकरणी राजकीय हेतूने प्रेरित होऊन निर्णय घेतला असल्याने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. आदर्श घोटाळा प्रकरणी खा. अशोक चव्हाण यांच्या विरोधात माझी चौकशी करून खटला चालवण्यास राज्यपाल राव यांनी परवानगी दिली होती.

राज्यपालांच्या त्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने आज बेकायदेशीर ठरवले. या पार्श्वभूमीवर खा. चव्हाण बोलत होते. मला न्यायव्यवस्थेवर विश्वास होता आणि त्याप्रमाणे आज सत्य बाहेर आले. आदर्श घोटाळ्याचे आरोप हे माझ्याविरोधात रचण्यात आलेले राजकीय षडयंत्र होते.

मी कोणतीही चुकीची कामे केलेली नाहीत. त्यामुळेच उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मी समाधानी असल्याचेही खा. चव्हाण यांनी सांगितले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!