औरंगाबाद : शासनाने सर्वासाठी घरे या योजने अंतर्गत गरीबांसाठी घरे हि योजना सुरु केलेली आहे, स्थानिक पुढारी मात्र शासकीय आधिका-यावर दबाव आणुन हि योजना दारुच्या दुकानदारांसाठी राबवत आहे हे खपवुन घेतले जाणार नाही, असे प्रतिपादन राकॉंचे नेते दत्ता गोर्डे यांनी केले.
ते राष्ट्रवादी कॉंग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजीत धरणे आंदोलनात बोलत होते, यावेळी बोलतांना गोर्डे पुढे म्हणाले की गोरगरीब लोक चाळीस चाळीस वर्षापासुन शासकीय जमीनीवर वासतव्य करीत आहे, केवळ पीआर कार्ड नसल्याने त्यांना घरकुलाचा लाभ मिळत नव्हता, म्हणुन शासनाने शासकीय जमीनी गरीबांच्या नावावर करण्याचा जीआर काढला, माञ् यांनी आधिका-यांवर दबाव आणुन शासकीय जागेवर असलेल्या दारु दुकाना नावावर करण्याचा डाव रचला, मात्र त्यांचा हा डाव आम्ही तडीस जाऊ देणार नाही, शेवट पर्यंत गरीबांसाठी लढुन त्यांना त्यांना त्यांच्या हक्काच्या घरकुलाचा लाभ मिळवून देणारच अशी ग्वाही या प्रसंगी बोलतांना गोर्डे यांनी दिली.
या धरणे आंदोलना प्रसंगी राकॉंचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विनोद तांबे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, युवकचे भाऊसाहेब तरमळे आंदीची भाषने झाली यावेळी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष निमेश पटेल, माजी नगरअध्यक्ष अनिल घोडके, नगरसेवक इरफान बागवान, अफरोज वड्डे, रतन गारदे, प्रविण शिंदे, अप्पासाहेब गायकवाड, भाऊसाहेब पिसे, भिकाजी आठवले, फाजल टेकडी, रावसाहेब आडसुल, रावसाहेब नाडे, गणेश पवार आदींची प्रमुख उपस्थीती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ग्रेट भेट! सलमानने शेअर केले मीराबाईसोबतच्या भेटीचे फोटो
- निराशादायक! इस्त्रोची जीएसएलव्ही- एफ १० उपग्रह मोहीम अपयशी
- आयपीएल तयारीसाठी माही चेन्नईच्या कॅम्पमध्ये दाखल, व्हिडीओ व्हायरल
- ऐतिहासिक महेमूद दरवाजा लगतच्या अतिक्रमण धारकांना २४ तासांची मुदत
- मंत्रिमंडळ बैठकीत ठरलं ; राज्यातील हॉटेल्स, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

