Share

कोरानाच्या काळात पोलिसांची काळजी घेण्यात सरकार अपयशी

Published On: 

 औरंगाबाद : महाराष्ट्रभरामध्ये कोरोनाचे रुग्ण खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मागच्या वर्षी मार्च मध्ये तसेच यंदाच्या कोरोनाच्या काळामध्ये पोलिसांच्या तब्येतीची काळजी घेण्यामध्ये सरकार अपयशी ठरले असल्याचे, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये परभणीमधील जिंतुरच्या आमदार मेघना बोर्डीकर – साकोरे यांनी सरकारवर तोफ डागली.

दरम्यान कोराेनाचा संसर्ग तसेच लॉकडाऊनच्या काळामध्ये पोलिसांनी डोळ्यात तेल घालून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता राज्यातील कानाकोपऱ्यात कडक सेवा बजावली. या दरम्यान ते स्वत: च्या कुटूंबापासून देखील दुर होते. तर अनेक पोलिसांचा ऑन ड्यूटी मृत्यू देखील झाला. पोलिसांच्या घरे बांधण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करुन द्यावा. त्यांच्या कुटूंबियांची काळजी घ्यावी. कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये शेतकरी, कामगार, कर्मचारी,  उसतोड कामगारांची उपासमार झाली. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याची मागणी देखील बोर्डीकर यांनी या वेळी केली.

मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार वसतीगृहाला निधी ठाकरे सरकारने उपलब्ध करुन द्यावा. देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये हे आदेश दिले होते. ते पुन्हा निधी देवून मराठा समाजावरील अन्याय दुर करण्याची मागणी देखील केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!