🕒 1 min read
औरंगाबाद : शासन निर्देशानुसार महापालिकेने २० पेक्षा अधिकचे कोरोना रूग्ण आढळणार्या वसाहती कन्टेनमेंट झोन म्हणून निश्चित करणे आवश्यक आहे. मात्र महिनाभरात शहरातील जवळपास सर्वच वसाहतींतून रूग्ण निघाले असून अजूनही निघत आहेत. त्यामुळे अख्खे शहरच कन्टेनमेंट झोन बनल्याची स्थिती आहे. कंन्टेनमेंट झोन निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण करणार्या औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन कंपनीची टीमही गोंधळात पडली आहे. त्यामुळे अजूनही शहरातील कन्टेममेंट झोन निश्चित झालेले नाहीत.
औरंगाबाद जिल्ह्यात १ मार्चपासून कोरोना संसर्गाने पुन्हा थैमान घातले आहे. मागील महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या गतीने वाढत आहे. त्यामुळे सक्रीय रूग्णांना सेवा देण्यास शासकीय तसेच खासगी आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा कोरोना स्ट्रेन अधिक गतीने पसरत असल्याने आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवरच शहरात कोरोना रूग्णांची संख्या अधिकचे आढळत असल्याने शासन निर्देशानुसार कन्टेनमेंट झोन निश्चित करून त्या ठिकाणी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे पालिकेने ठरवले. मात्र मागील महिनाभरापासून शहराच्या विविध भागांतून रोजच अधिकचे रूग्ण निघत असल्याने आजघडीला अशी एकही वसाहत नाही की जेथे २० पेक्षा कमी रूग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे अख्खे शहरच कन्टेनमेंट झोन बनल्याची स्थिती आहे.
अशा अवस्थेत पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शासन निर्देशानुसार कन्टेनमेंट झोन निश्चित करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम स्मार्ट सिटीच्या एएससीडीसीएल कंपनीच्या टीमला दिले आहे. मात्र मागील महिनाभरातील सर्वेक्षणात शहरातील सर्वच वसाहतींतून अधिकचे रूग्ण निघाले असल्याने टीमही गोंधळली आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम यांच्या नेतृत्वात स्मार्ट सिटीची टीम कन्टेनमेंट झोनचे सर्वेक्षण करत आहे. यासाठी शहरातील पालिकेच्या ३७ आरोग्य केंद्रांशी जोडलेल्या प्रत्येक भागातील आशा वर्कर्सकडून नव्याने आढळणार्या कोरोना रूग्णांचा डाटा संकलित केला जात आहे. त्या आधारावर कोणत्या भागात अधिकचे रूग्ण निघत आहे, हे तपासले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या वतीने ‘मी जबाबदार’ मोहिमेचे आयोजन, कोरोनाबाबत जनजागृती करणार
- खाजगी रुग्णालयांची अरेरावी! भाजपचे माजी शहराध्यक्ष म्हणाले, ‘वेळ आल्यावर बघून घेईल’
- राज्यात रक्ताचा तुटवडा; आव्हाडांनी रक्तदान करत केल ‘हे’ आव्हान
- पवार-शाह भेट महाराष्ट्राच्या हिताचीच – नारायण राणे
- संतापजनक : बागेतील आंबे खाल्ले म्हणून अल्पवयीन मुलांना केली बेदम मारहाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
