मुंबई : केंद्राचे सरकार, पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नेते असतात. मग राज्यांतील सरकारे भले त्यांना मानणाऱ्या राजकीय पक्षाची नसोत. त्या राज्यांना अस्थिर करणे म्हणजे राष्ट्रीय एकतेस चूड लावण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील घडामोडी हा चूड लावण्याचाच प्रकार आहे. अर्थात, महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनामधून दिला आहे.
देशभरातच एकंदरीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बरी नाही. अनेक राज्यांत नक्षलवादी कारवाया वाढल्या असल्याने गृहमंत्री शहा यांना तातडीने मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी लागली आहे. भाजपविरोधात सरकारे ज्या राज्यांत आहेत, तेथे अनेक भाजप पुढारी फक्त चिखलफेक करतात याची बक्षिसी म्हणून ‘झेड प्लस’ दर्जाची केंद्रीय सुरक्षा देण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र वगैरे राज्यांत हे प्रामुख्याने दिसते, असं सामनामध्ये राऊतांनी म्हंटल आहे.
‘सीआरपीएफ’चे शेकडो जवान अशाप्रकारे खास कर्तव्य बजावत आहेत. ही शक्ती राष्ट्रीय सुरक्षेला, जनतेच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांविरुद्ध लावणे गरजेचे आहे, पण सध्या आपल्या देशात काही वेगळेच घडताना दिसत आहे. सध्याच्या युगात कावळे मोती खात आहेत आणि हंस दाणे टिपत आहेत. महाराष्ट्रासह देशातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत एकंदरीत घडामोडी पाहता तेच म्हणावे लागेल,चट असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘यापूर्वी तीन नगरसेवकांचा प्रभाग असताना राष्ट्रवादीला यश मिळाले होते,आताही पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देतील’
- उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासाठी नाही तर पदासाठी तडजोड केली; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
- ओबीसी आरक्षण अध्यादेशावर राज्यपाल आज सही करतील अशी अपेक्षा-हसन मुश्रीफ
- ठरलं ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठे बहुसदस्यीय तर कुठे एक सदस्यीय
- पुण्यात उभं राहणार साखर संग्रहालय; राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

