Share

पेपरफुटी प्रकरण: महाराष्ट्रातल्या दहावीच्या विद्यार्थ्यांवरचं संकट तूर्तास टळलं

Published On: 

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची तारीख जाहीर केली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव (शालेय शिक्षण) अनिल स्वरूप यांनी अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा एकदा २५ एप्रिलला होणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, दहावीच्या गणित विषयाबाबत केलेल्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी तपास सुरू असून १५ दिवसांत फेरपरीक्षा घ्यायची अथवा नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगत फेरपरीक्षा झाल्यास ती फक्त दिल्ली आणि हरयाणामध्येच होईल आणि ती जुलैमध्ये घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पेपरफुटीमुळे दहावी, बारावीची परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने( सीबीएसई) घेतला होता. यावर्षी दहावी, बारावीची परीक्षा सुरु असतांना पेपरफुटीचे अनेक प्रकाराने समोर आले होते. अनेक प्रकरणामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा हात असल्याचे समोर आले होते. सीबीएसईने पेपरफुटीमुळे मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, सीबीएसई परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच फुटल्या. हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा, पण स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहात? सरकारला जर प्रश्नपत्रिकांची गोपनीयता नीट राखता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष, त्यांनी का पुन्हा त्या विषयांच्या परीक्षेला बसायचं? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. तसेच त्यांनी पालकांना मुलांना फेरपरीक्षेला बसवू नका, असे आवाहन केले होते.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!