🕒 1 min read
रायपूर : छत्तीसगडमध्ये एक गंभीर घटना घडली आहे. नारायणपूर जिल्ह्यात जवानांनी भरलेली बस माओवाद्यांनी स्फोट करुन उडवली आहे. या घटनेत तीन जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या बसमध्ये एकूण ५० च्या आसपास जवान या प्रवास करत होते, अशी माहिती समोर येत आहे.
Three District Reserve Guard (DRG) jawans have lost their lives and a few injured in IED blast triggered by Naxals in Narayanpur district; details awaited: DGP Chhattisgarh, DM Awasthi
(file photo) pic.twitter.com/TEGAwTAUDJ
— ANI (@ANI) March 23, 2021
हल्ल्यातील जखमींची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अतिदुर्गम भाग असल्याने नेटवर्क नाही, त्यामुळे माहिती मिळवण्यासही अडचणी येत आहेत. जखमी जवानांना मदत पोहोचवण्यासाठी पोलीस विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. जवळच्या सगळया कॅम्पमधून मदतीसाठी जवान रवाना करण्यात आले आहेत. नक्षलवाद्यांनी काडेनर आणि मांडोडाजवळ जवानांच्या बसला लक्ष्य केले. जवान आपले ऑपरेशन पूर्ण करून परतत असतानाच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
छत्तीसगडचे डीएम अवस्थी म्हणाले की, नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात डीआरजीच्या (जिल्हा राखीव गार्ड) जवानांचा मृत्यू झाला. तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना नारायणपूरच्या रुग्णालयात आणण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्या’ घटनेनंतर कोविड सेंटरने महिलांचा वॉर्डच बदलला
- धक्कादायक! यु ट्यूबवर ‘तो’ व्हिडिओ पाहून जावयाची सासुरवाडीतच आत्महत्या
- आता ‘या’ रुग्णांना मिळणार टप्प्याटप्प्याने सुट्टी
- पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या १४ दहशतवाद्यांना मृत्यूदंड
- होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांची फोनवरुन विचारपूस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

