Share

आता ‘या’ रुग्णांना मिळणार टप्प्याटप्प्याने सुट्टी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाची लक्षणे नसलेल्या तसेच रुम एअरवर असलेल्या रुग्णांना आता घाटी रूग्णालयातून महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्याऐवजी टप्प्या-टप्प्याने सुट्टी दिली जाणार आहे. अशाच ३० रुग्णांना सोमवारी घाटीतून सुट्टी देण्यात आली आहे. तर यापुढे गंभीर रुग्णांनाच प्राधान्याने दाखल करून घेतले जाईल, असा निर्णय घाटी प्रशासनाने घेतला आहे.

मार्च महिन्यापासून कोरोनाचा शहरात उद्रेक झाला आहे. ५ मार्चपासून कोरोना रूग्णांत सतत वाढ होत चालली आहे. महिनाभरापूर्वीच जिल्ह्यात रोजचे २० ते २५ कोरोना रूग्ण निघायचे. मात्र मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात दररोज हजारपेक्षा अधिक रूग्ण निघत आहेत.

शहरात वाढत्या रूग्णसंख्येमुळे उपचारासाठी बेड्सच्या कमतरतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रूग्णांना त्यांच्या राहत्या घरीच होम आयसोलेशन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

तसेच घाटीतील रुम एअरवर असलेल्या रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यादृष्टीने रविवारपासून रुग्णांच्या नातेवाइकांचे समुपदेशन करण्यास सुरुवात झाली आहे. पण रुग्ण जर रुम एअरवर असेल तर रुग्णालयातून सुट्टी द्यावी. अन्यथा होम आयसोलेशनमध्ये रुग्णाला ठेवण्यात यावे, अशी मागणी नातेवाइकांनी पुढे केली आहे.

त्यामुळे या मागणीचा घाटी प्रशासनाने सकारात्मकरित्या विचार करून अशा रुग्णांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता रोज आयसीएमआरच्या गाईडलाईननुसार रुग्णांना सुट्टी देऊन लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या कमी केली जाणार आहे, असेही डॉ. कैलास झिने म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!