🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : येत्या २३ तारखेला देशात कोणाचे सरकार येणार हे कळणार असून त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत शेतकरी आणि राज्यात पडलेला भीषण दुष्काळ हे मुद्दे केंद्रस्थानी असणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून भाजपने रणनीती आखण्यास सुरवात केल्याच चित्र दिसत आहेत.
त्यानुसारच लोकसभा निवडणुकीच्या निकालांआधीच भाजपने विधानसभेची तयारी सुरु केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. मार्च २०१६-१७ ते २०१८ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन मोठा दिलासा देण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

