मुंबई : एकीकडे राज्य सरकारने पायी वारीला परवानगी दिली नाही राज्यात अजूनही निर्बंध कायम आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आहे. त्यातच ऐका वृत्तवाहिनीने ठाण्यात स्टिंग ऑपरेशन केले असता ठाणे शहरात बार सुरू असल्याचे समोर आले आहे. यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
महाराष्ट्राचा विकास नाही तर टक्केवारी आणि वाझे या सरकारचे सूत्र असताना वेगळ काय होणारं? १०० कोटीचे टार्गेट पूर्ण करायचं असेल तर बारमध्ये काय चालत याकडे दुर्लक्ष कराव लागणार ना महाआघाडी सरकारला. अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत असून ठाण्यात बार कोणाच्या आशीर्वादाने चालतात असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्राचा विकास नाही तर टक्केवारी आणि वाजे या सरकारचे सूत्र असताना वेगळ काय होणारं? १०० कोटीचे टार्गेट पूर्ण करायचं असेल तर बार मध्ये काय चालत याकडे दुर्लक्ष कराव लागणार ना महाआघाडी सरकारला. https://t.co/jVm4oYryx4
— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 19, 2021
डान्स बारप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि दोन एसीपी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. चारही अधिकाऱ्यांची त्यांच्या सध्याच्या पदावरून काढून कंट्रोल रूमला बदली केली आहे. अतिरिक्त आयुक्तांना या सर्व प्रकरणाची चौकशी करून 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठी पाऊल पडते पुढे! मराठी चित्रपट आता आंतरराष्ट्रीय महोत्सवात झळकणार
- छत्री, मोदी आणि कॉंग्रेस! सोशल मीडियावर मोदींचा स्वावलंबीपणा व्हायरल
- ‘पेगासस’ प्रकरणावर मोदी, शाहांनी स्पष्टीकरण द्यावे; संजय राऊतांची मागणी
- ‘राज्य चालवता न आलेल्या माणसाने गाडी चालवली यात काय मोठा पराक्रम?’ निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
- ‘आमची मुंबई’चे ढोल बडवणारे सेलेब्रिटी आता कोणत्या बिळात लपले?’


