Share

‘ठाकूर यांनी मागणी करायच्या आधीच नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- कॉंग्रेस नेत्या व उद्धव ठाकरे सरकारमधील महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तब्बल आठ वर्ष जुन्या प्रकरणात ठाकूर यांना ही शिक्षा झाली आहे.

पोलीस कॉन्स्टेबलवर हात उचलणे यशोमती ठाकूर यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे.ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिर परिसरात पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना २४ मार्च २०१२ रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि रुपये १५ हजार दंड आकारण्यात आला आहे.सोबतच त्यांचा कार चालक आणि दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले आहेत. फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला आहे.

दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या संदर्भात मार्मिक अशी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात,गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता पण ‘खिसे गरम’ करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?असा टोला देखील वाघ यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!