🕒 1 min read
मुंबई: कालचा दिवस (२९ जून) इतिहासात कायम अधोरेखित केला जाईल. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काल रात्री ९ वाजता फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत आपले मुख्यमंत्री पद सोडले. अनेक राजकीय घडामोडीनंतर अखेर महाराष्ट्रातील राजकारणावर पडदा पडला. यानंतर स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
“महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वाभिमानी आणि शेकापच्या झोपडीतील आड्याचा तुम्ही एक एक बांबू उपसला. पण ईडीच्या वादळात तुमचा अख्खा वाडा उद्धवस्त झाला. देवाच्या काठीला आवाज नसतो!”, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

दरम्यान शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्याने आणि १० अपक्ष आमदारांनी साथ सोडल्याने महाविकास आघाडी सरकार आधीच संकटात आले होते. सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही, असे स्पष्ट दिसत असताना उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. आता देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल नवे सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करतील. भक्कम संख्याबळासह फडणवीस पुन्हा सत्तेत येणे निश्चित आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Governor : राज्यपाल कोश्यारींनी केले ‘विशेष अधिवेशन’ स्थगित; महाराष्ट्रातील राजकारणावर पडदा
- Jitendra Awhad : महाविकास आघाडी सरकार कोसळले! जितेंद्र आव्हाडांनी सहकाऱ्यांचे मानले आभार
- Political Crisis : बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना १४९ ची नोटीस
- Sanjay Raut : आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांच भावुक ट्विट
- आस्तिक कुमार पांडे यांची बदली, ‘हे’ आहेत औरंगाबादचे नवे महापालिका आयुक्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
