Share

वाढत्या परीक्षा घोटाळ्यांमुळे संपूर्ण देशात मिलिट्री राज लावायला हवं- बच्चू कडू

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात हे निष्पन्न झाले असून आरोग्य विभागाच्या परीक्षेतील पेपरफुटीचा तपास करीत असताना म्हाडा व टीईटीच्या परीक्षेमधील गैरव्यवहार समोर आले आहे. त्यामुळे सर्व स्तराहून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू(Bacchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली असून वाढत्या परीक्षा घोटाळ्यांमुळे संपूर्ण देशात मिलिट्री राज लावायला हवं, असे ते म्हणाले आहेत.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना बच्चू कडू म्हणाले की,‘कुणावरच विश्वास राहिलेला नाही, इतकी वाईट अवस्था आहे. वाढत्या परीक्षा घोटाळ्यांमुळे संपूर्ण देशात मिलिट्री राज लावायला हवं. तसेच या घोटाळ्याला पूर्णपणे व्यवस्था जबाबदार आहे. त्यामुळे मिलिट्री आणल्यानंतरच सगळे व्यवस्थित होईल,’ असेही बच्चू कडू म्हणाले आहेत.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘परीक्षांमधील हा घोळ हे व्यवस्थेचे मोठे अपयश असून हे मोठे रॅकेट मोडून काढण्यासाठी या सगळ्यांवर कारवाई करण्यासाठी जनआंदोलन करण्याची गरज आहे’, असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!