मुंबई : असं क्वचित होत असेल की, एखादा माणूस अनपेक्षित आल्यानंतर तो आपलं पद सोडताना लोकं रडतात. ही माझ्या आयुष्याची खरी कमाई आहे!
तुमच्या डोळ्यातल्या अश्रूंची कधीही प्रतारणा होणार नाही…, हे अश्रू माझी मोठी ताकद” असे उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्याकडून महाराष्ट्र कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. शिवसेनेला हटवून तथाकथित शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. ते रात्रभर सत्तेसाठी खेळत होते.