🕒 1 min read
चेन्नई : तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीत लागलेल्या आगीत आतापर्यंत मृतांची संख्या 11 झाली आहे, तर 36 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्व मृतांच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे, तर गंभीर जखमींना 1 लाख रुपये जाहीर केले आहेत.
Tamil Nadu: Death toll rises to 11 in the fire at a firecracker factory in Virudhunagar, 36 injured. CM announces ex-gratia of Rs 3 Lakhs each to kin of deceased & Rs 1 Lakh for critically injured
PM announces Rs 2 lakhs each for kin of deceased & Rs 50,000 for seriously injured pic.twitter.com/W2XbpgeBwO
— ANI (@ANI) February 12, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फटाका कारखान्यातील स्फोटात मृत पावलेल्यांबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, तामिळनाडूच्या विरुधुनगरमधील फटाका कारखान्यात लागलेली आगीची घटना दुःखदायक आहे. या घटनेतील मृतांबद्दल माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. जखमी लवकर बरे होतील, ही आशा आहे. अधिकारी प्रभावित झालेल्यांची मदत करण्यासाठी काम करत आहेत.
An ex-gratia of Rs. 2 lakh each has been approved from PMNRF for the next of kin of those who have lost their lives due to a fire in Virudhunagar, Tamil Nadu. Rs. 50,000 would be given to those seriously injured.
— PMO India (@PMOIndia) February 12, 2021
पंतप्रधानांकडून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत
विरुधुनगर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
राहुल गांधींचे राज्य सरकारला मदतीचे आवाहन
तामिळनाडूतील अग्निशामक दुर्घटनेसंदर्भात त्वरित मदतीसाठी राहुल गांधींनी राज्य सरकारला आवाहन केले आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाका फॅक्टरीतील स्फोटात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना. जे अजूनही आत अडकले आहेत, त्यांच्या सुरक्षित राहण्यासाठी प्रार्थना. राज्य सरकारला तातडीने बचाव, मदत देण्याचे मी आवाहन करतो.
महत्वाच्या बातम्या
- पक्षात माझा जीव गुदमरतोय म्हणत ममतांच्या खासदाराचा राजीनामा, तृणमूलला गळती सुरूच
- 100 हून जास्त खेळाडू राज्य सरकारला परत करणार ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’
- निवडणूक आली अन् ‘या’ भाजपशासित राज्यात सरकारने पेट्रोल-दारू स्वस्त केली!
- केंद्राच्या जल योजनेत औरंगाबादचा समावेश कधी? – खा. इम्तियाज जलील
- जालना: ओपीडी सुरू, मात्र जिल्हा रुग्णालयाकडून ना प्रसिद्धिपत्रक, ना आवाहन; रुग्णांना मनस्ताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
