🕒 1 min read
औरंगाबाद : जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी संसदेत शहर व जिल्ह्यातील प्रश्नांना वाचा फोडली. औरंगाबादकरांच्या पाणीप्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, केंद्राची घर घर जल योजना आहे, तरीही औरंगाबादकरांना दररोज पाणी मिळत नाही. शहरात कुठे सात दिवस, तर कुठे नऊ दिवसांनी पाणीपुरवठा होतो, ही शरमेची बाब आहे. केंद्राच्या योजनेंतर्गत शहराला दीड-दोन वर्षांत नियमित पाणी पुरवठा होऊ शकेल का? असा सवाल त्यांनी संसदेमध्ये संबंधित मंत्रिमहोदयांना केला.
जगप्रसिद्ध जायकवाडी धरण उशाला असूनही औरंगाबादकरांच्या घशाला सरकारच्या उदासीनमध्ये कायम कोरड पडलेली आहे. एवढी वर्षे होऊनही सरकारला जायकवाडीहून नियमित पाणी उपसा करणारी यंत्रणा उभारता आलेली नाही. त्यामुळे जल मिशनमध्ये औरंगाबादचा समोवश होणार का? असा सवाल जलील यांनी उपस्थित केला.
AIMIM Aurangabad MP @imtiaz_jaleel raised the issue of water supply in Aurangabad and demanded the Government to include Aurangabad city in the Jal Jeevan Mission Scheme to improve the water supply in the city pic.twitter.com/RbfFMk14K2
— AIMIM (@aimim_national) February 11, 2021
त्यांच्या या प्रश्नांवर केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले की, 2019 मध्येच मोदी सरकारने जल जीवन योजना सुरू केली. प्रत्येक घरातील विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, त्यांना दूषित पाणी प्यावे लागू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. अशाच समस्या शहरी भागातही आहेत. औरंगाबादच्या बाबतीत बोलायचे तर शहराचा लवकरच या योजनेत समावेश करू. दीड-दोन वर्षे नाही तर येत्या वर्षातच शहरासाठी ही योजना आणण्याचे आश्वासन मंत्री शेखावत यांनी खा. जलील यांना दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पक्षात माझा जीव गुदमरतोय म्हणत ममतांच्या खासदाराचा राजीनामा, तृणमूलला गळती सुरूच
- 100 हून जास्त खेळाडू राज्य सरकारला परत करणार ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’
- निवडणूक आली अन् ‘या’ भाजपशासित राज्यात सरकारने पेट्रोल-दारू स्वस्त केली!
- गुन्हेगार पर्यटन सुरू करायचं असेल तर मंत्रालय सध्या एक नंबर वर आहे; राणेंची गंभीर टीका
- जालना: ओपीडी सुरू, मात्र जिल्हा रुग्णालयाकडून ना प्रसिद्धिपत्रक, ना आवाहन; रुग्णांना मनस्ताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
