Share

कृषी कायद्याला विरोध, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला काळ्या फिती लावून निषेध

Published On: 

औरंंगाबाद : केंद्रशासनाने मंजूर केलेले जाचक कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या सहा महिन्यापासून दिल्लीच्या सिमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. सहा महिन्यापासून शेतक-यांचे आंदोलन सुरू असून केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाची दखल घेत नसल्याने स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले.
केंद्रशासनाने मंजूर केलेले जाचक कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी पंजाब, हरियाणा आदी राज्यातील शेतकरी मागील सहा महिन्यापासून दिल्लीत आंदोलन करीत आहेत. शेतक-यांच्या आंदोलनाकडे ढुंकुनही न पाहणा-या केंद्र सरकारचा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्र्यांनी निषेध केला.
स्वाभीमानी शेतकरी संघटना युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पुजा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी काळ्या फिती बांधुन केंद्र सरकारचा निषेध करणा-या घोषणा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!