लातूर : राज्य विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात भाजपच्या ११ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. या निलंबनामुळे हे अधिवेशन देखील चांगलेच वादळी ठरले. मात्र, या निलंबनाचा विकास कामांवर परिणाम होणार नाही. तर आपण अधिक ताकदीने कामे मार्गी लावणार असल्याचा विश्वास आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केलाय.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आमदार म्हणून अभिमन्यू पवार यांची ओळख आहे. किंबहूना देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच पवार राजकारणात आले आहेत. दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनात वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलेल्या आमदारांमध्ये अभिमन्यू पवार यांचाही समावेश आहे. या निलंबनामागे महाविकास आघाडीची वेगळी चाल असल्याचा आरोप पवार यांनी याआधीही केला होता. या संदर्भात बोलताना त्यांनी आपण अधिक ताकदीने कामे मार्गी लावणार असल्याचे म्हटले आहे.
२ दिवसीय अधिवेशनात ओबीसी आरक्षणाचा विषय आक्रमकपणे मांडल्याबद्दल कासार सिरसी मंडळातील ओबीसी समाजबांधवांनी ठिकठिकाणी सत्कार करून अभिनंदन केले. निलंबनामुळे विकासकामांवर किंचितही परिणाम होणार नसून उलट अधिक ताकदीने कामे मार्गी लावीन असा विश्वास उपस्थितांना दिला. pic.twitter.com/bwJb9T8rse
— Abhimanyu Pawar (@AbhiPawarBJP) July 9, 2021
अभिमन्यू पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘२ दिवसीय अधिवेशनात ओबीसी आरक्षणाचा विषय आक्रमकपणे मांडल्याबद्दल कासार सिरसी मंडळातील ओबीसी समाजबांधवांनी ठिकठिकाणी सत्कार करून अभिनंदन केले. निलंबनामुळे विकासकामांवर किंचितही परिणाम होणार नसून उलट अधिक ताकदीने कामे मार्गी लावीन असा विश्वास उपस्थितांना दिला.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदी सरकारने देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार?’ ; पटोलेंचा टोला
- ‘५५ आमदारात मुख्यमंत्री झाला, ५० नगरसेवकांमध्ये पिंपरी-चिंचवडचा महापौर का होणार नाही?’
- गोकुळ दूध दरात वाढ : गायी-म्हशीच्या दुधाच्या खरेदी-विक्री दरात वाढ !
- पंकजाताई म्हणाल्या भाजपला टीम देवेंद्र, टीम नरेंद्र मान्य नाही; तर फडणवीस म्हणाले…
- बाचाबाची झाली पण भाजपच्या एकाही नेत्याने शिवीगाळ केलेली नाही – फडणवीस


