मुंबई: उज्ज्वला गॅस योजनेखाली ८ कोटी गोरगरीब जनतेला मोफत कनेक्शन देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. त्यातील सुमारे ६ कोटी कनेक्शन देण्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतो. पण गॅसच्या दरात सातत्याने वाढ करण्यात येत आहे. नुकतेच आणखी ₹५० ची वाढ केल्याने सिलिंडर हजार रुपयांच्या पार गेले. यावरच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
सिलिंडरच्या वाढत्या दरांमुळे उज्ज्वला गॅस योजनेच्या सहा कोटी लाभार्थ्यांपैकी सुमारे ३ कोटी ५९ लाख लाभार्थ्यांनी कनेक्शन घेतल्यानंतर सिलिंडर घेतलेच नसल्याचे उघड झाले आहे. गोरगरीबांना दिलासा देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या योजनेच्या नावाखाली सरकारने आपली पाठ थोपटून घेतली. अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
उज्ज्वला गॅस योजनेखाली ८ कोटी गोरगरीब जनतेला मोफत कनेक्शन देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली.त्यातील सुमारे ६ कोटी कनेक्शन देण्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतो.पण गॅसच्या दरात सातत्याने वाढ करण्यात येत आहे.नुकतेच आणखी ₹५० ची वाढ केल्याने सिलिंडर हजार रुपयांच्या पार गेले. pic.twitter.com/Yw0JkeDWhX
— Supriya Sule (@supriya_sule) July 8, 2022
केंद्र सरकारने मोठे दावे केले, पण ही योजना फसली असून त्याचे क्रेडीट याच सरकारने सातत्याने केलेल्या दरवाढीला आहे. माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की, कृपया आपण या देशातील जनतेला महागाई आणि गॅसच्या दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी ठोस पावले उचलावी. असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचे आजपासून शक्तीप्रदर्शन; बंडखोरांच्या मतदार संघात ‘निष्ठा यात्रा’
- Ranvir Singh : रणवीरने केला लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा खुलासा ; म्हणाला, “मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये सेक्स…”
- Nitesh Rane : “…तर ‘निष्ठा’ यात्रा काढण्याची वेळ आली नसती”, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
- Rupali Thombre : “बाळासाहेब ठाकरे यांचाच धनुष्यबाण…”, रुपाली ठोंबरेंची शिंदे गटावर टीका
- Uddhav Thackeray : “शिवसैनिकांनो धनुष्यबाण हिसकावण्याचा प्रयत्न होणार, नव्या…”, उद्धव ठाकरेंचे आवाहन