टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ सांताक्रूझ येथील सभेदरम्यान फोडला. तसेच राज्यात आता आघाडीचं सरकार येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची सत्ता येणार आहे. अशावेळेस जर राज ठाकरे विरोधीपक्षात राहणार असतील, तर आम्हाला आनंद आहे, असे राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे म्हणाले.
पुढे बोलताना तटकरे यांनी शिवसेनेवर शेलक्या शब्दात समाचार घेतला. मुख्यमंत्री स्वबळावर करायचा असेल, तर 145 जागा लागतात. मग 124 जागा लढवून स्वतःचा मुख्यमंत्री करण्याची स्वप्न कसं बघतात, हे समजत नाही, असे तटकरे म्हणाले.
तसेच सांताक्रूझ येथे सभेमध्ये ठाकरे म्हणाले, ‘आज राज्याला विरोधी पक्षाची गरज आहे. कारण विरोधी पक्ष नेतेचं भाजपात पळत आहेत. जर विरोधी पक्ष नेताच पळत असले तर जनतेचे प्रश्न कोण मांडणार? त्यामुळे मी या विधानाभेला तुमच्या समोर इतिहासात कोणीही न घेतलेली भूमिका घेऊन आलोय. विरोधी पक्षाची धुरा माझ्या उमेदवारांच्या हातात द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182502165899698176?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182315280678047745?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182312063739166720?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

