Share

उस्मानाबादेत उद्या ऊस परिषद; राजू शेट्टी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन उतरणार मैदानात!

Published On: 

उस्मानाबाद : जिल्ह्यातील वाघोली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे ऊस परिषद घेणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब, उस्मानाबाद या तालुक्यांसह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हातातोंडाशी आलेली खरिपाची पिकं वाहून गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. हे शेतकरी सध्या मदतीसाठी सरकारकडे आस लावून बसले आहेत. त्यामुळे ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे.

मराठवाड्यात झालेले नुकसान पाहता जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, यासोबतच उसाची एक रकमी एफ आर पी रक्कम शेतकऱ्यांना मिळावी या सोबतच काही इतर लहान लहान मागण्या या शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांच्याकडे केलेल्या होत्या. याच अनुषंगाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी राजू शेट्टी हे आता मैदानात उतरणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी आता काय भूमिका घेणार? काय बोलणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. उद्या होणाऱ्या या कार्यक्रमास नुकसानग्रस्त शेतकरी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या संघटनेस उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी केले आहे .

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!