🕒 1 min read
मुंबई: राजकारणातील भीष्म पितामह गणपतराव देशमुख यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्या जाण्याने राजकारणातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. गणपतराव देशमुख यांच्या जाण्याने महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. चारित्र्य, संयम, कणखरपणा, विकास आणि प्रचंड लोकसंग्रह राखत गणपतराव यांनी आजच्यासारखे काळातही सत्व जपलं होतं. असा राजकारणी पुन्हा होणे नाही.अशी शोकभावना महिला व बाल विकास कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
गणपतराव देशमुख यांच्या जाण्याने महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. चारित्र्य, संयम, कणखरपणा, विकास आणि प्रचंड लोकसंग्रह राखत गणपतराव यांनी आजच्यासारखे काळातही सत्व जपलं होतं. असा राजकारणी पुन्हा होणे नाही !! pic.twitter.com/y7WpCPb0WG
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) July 31, 2021
गणपतराव देशमुख एकाच मतदारसंघातून आणि शेकाप या एकाच पक्षाकडून सर्वाधिक अकरावेळा निवडून आलेले आणि तब्बल ५० वर्षे राज्याच्या विधानसभेत आमदार राहिले आहे. मोहोळ या तालुक्यात पेनूर येथे १० ऑगस्ट १९२६ रोजी एका शेतकरी कुटुंबात गणपतराव देशमुख यांचा जन्म झाला.तब्बल ५० वर्ष त्यांनी राजकारणात कारकीर्द निभावली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज राजकारण्यांनी गणपतराव देशमुख यांच्या निधनाने शोक व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जातीयवादी देशविघातक शक्तींना रोखण्याचे काम सेवादलच करु शकते’
- ‘मोदींच्या दौऱ्याची अपेक्षा करण्यात चुक नाही; मदत उशिरा नको, वेळेवर द्या’
- ‘प्रत्येकवेळी अभिमान वाटेल अशी कामगिरी केली’, प्रियांकाकडून मेरीकोमचं कौतुक
- ‘भिंत बांधावी ही कल्पना, आग्रह नाही’; विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री ठाकरेंच स्पष्टीकरण
- ‘धरणात मुतण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांना राणेंचं अरे-तुरे इतके का झोंबावं?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
