Share

‘राज्याने आज ५ कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला, मुख्यमंत्र्यांची माहिती’

Published On: 

मुंबई: राज्यात आज एकूण ५ कोटी नागरिकांनी लसीकरण केले आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग राज्यात वाढत असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. दरम्यान राज्यात आतापर्यंत ५ कोटी नागरिकांनी लसीचा डोस घेतला आहे.

लसीकरणाचा वेग वाढतो आहे. तसेच कोरोना संक्रमणाचा वेगही कमी होताना दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांतील बंधने शिथिल केली आहेत. १५ ऑगस्टपासून व्यापाऱ्यांना १० वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यास परवानगी मिळालेली आहे. तर राज्यातील कोरोना संक्रमणाचा प्रभाव जिथे कमी असेल त्याठिकाणी शाळा उघडण्याचे संकेतही राज्य शासनाने दिले आहेत.

दरम्यान राज्यात गेली २४ तासात ४,१४५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ६१ लाख ९५ हजार ७४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८६ टक्के आहे. त्यात लसीकरणाचा वेगही अधिक असल्याने राज्यात कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!