Share

महाराष्ट्र वक्फ बोर्डासाठी हवे ५०० कोटींचे विशेष पॅकेज, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात वक्फ मंडळाच्या कोट्यावधी रुपयांच्या जमिनी आहेत. यातील अनेक जागांवर अतिक्रमन झाले आहे. तर काही जागा बनावट कागदपत्रे तयार करुन विकण्यात आल्या आहेत. या सर्व मालमत्ता पुन्हा ताब्यात घेण्यासाठी तसेच त्यांची कागदपत्रे तयार करुन, सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी वक्फ बोर्डाला ५०० कोटींचे विशेष पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी वक्फ बोर्डाच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात वक्फ मंडळाच्या सदस्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. या संबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत लवकरच बैठक घेवून यावर निर्णय घेण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे. वक्फ बोर्डाच्या सदस्यांनी केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत. नुकत्याच झालेल्या मंडळाच्या बैठकीतही या विषयी सविस्तर चर्चा झाली होती. त्यानंतर ही पवार यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या वेळी वक्फ मंडळाच्या सदस्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजीया खान यांचीही उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!