🕒 1 min read
मुंबई:- सोनिया गांधी या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख आहेत. राज्यातलं आघाडी सरकार अस्तित्वात आलं तेव्हा किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला होता. त्याविषयीचे काही मुद्दे त्यांनी पत्राद्वारे मांडले आहेत. याचा अर्थ हा दबावतंत्राचा भाग आहे, असं समजण्याचं कारण नाही, अशी सावध प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना बॅकफूटवर आल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्रं म्हणजे दबावतंत्र नाही. उलट त्यांनी या पत्रात किमान समान कार्यक्रमाशी संबंधित काही मुद्दे मांडले आहेत, त्याचं स्वागतच आहे. किमान समान कार्यक्रमात दलित आणि शोषितांच्या विकासाची हमी देण्यात आली आहे. त्यावर आघाडी सरकार काम करत आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किमान समान कार्यक्रम कसा लागू होईल, याकडे लक्ष देत आहेत, असंही राऊत म्हणाले.
दरम्यान, राज्यात कोरोनाचं संकट सुरू होतं. त्यामुळे राज्याला मोठी आर्थिक झळ सोसावी लागली. आता कुठे राज्याची आर्थिक गाडी रुळावर येतेय, असं सांगतानाच सोनिया गांधी यांनी या पत्रात मांडलेल्या मुद्द्यांचं स्वागतच असून त्यानुसार काम केलं जाईल, असंही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- त्या’ व्हायरल व्हिडिओवर चौकशी दरम्यान करणचे अजब उत्तर
- मुंबईत अंबानी-अदानी विरोधात निघणार शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा
- राष्ट्रीय महामार्गावर 1 जानेवारी पासून ‘फास्टॅगची’ अंमलबजावणी
- “अजित पवार भ्रष्टाचाराचे आरोप आणि घाणेरड्या वक्तव्यांमुळेच चर्चेत असतात”
- कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळवायचा आहे ? मग ‘असा’ करा अर्ज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
