Share

‘सोमय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात’, राऊतांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय आले आहे. कराड येथे पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांनी अलिबाग येथे जाणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘अलिबाग आणि जरंडेश्वर येथेही उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी केलेल्या चुकीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी जाणार आहे. अलिबाग येथे मुख्यमंत्री ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने घेतलेल्या बेनामी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी जाणार’ असे सोमय्यांनी म्हटले.

‘ठाकरे कुटुंबाकडे १९ बंगले आहेत. हे बंगले कुठून आले? उद्धव ठाकरे यांनी पत्नीच्या नावे बंगले घेतले आहेत. त्यामुळे सोमवारी अलिबागला जाऊन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या नावाने घेतलेल्या बंगल्याची पाहणी करणार आहे, असं सोमय्या यांनी सांगितले.

सोमय्या यांच्या या आरोपावर शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘किरीट सोमय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या लोकांच्या जमिनी शोधाव्यात असा टोला राऊत यांनी लगावला आहे. मुंबई येथे माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी सोमय्यांच्या आरोपाचा समाचार घेतला.

ते म्हणाले, ‘या देशात लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. असे आरोप याआधीही झाले आहेत. आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला कोणी टाळं लावू शकत नाही. कोणी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आरोप करायचं ठरवलं असेल तर आम्ही काहीच करु शकत नाही. पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यावरही आरोप होतात. आरोप करणे सध्या फॅशन झाली आहे, त्यानुसार त्यांनी आरोप करत राहावे’ असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!