मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावले जात आहेत. पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध म्हणजेच मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दुसरीकडे, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा रविवारी ४९ हजारांहून वर गेल्याने सरकार देखील कडक निर्बंध वा लॉकडाऊन करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली आहे.
राज्यात शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला असून सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. सध्या राज्य सरकारने पूर्ण लॉकडाऊन लागू केला नसला तरी येत्या काही दिवसात लॉकडाऊनचा पर्याय असल्याची तंबीही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
‘लॉकडाऊन हा कोणालाच आवडत नाही. परंतु परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात. राज्यात सध्या वीकेंड लॉकडाऊन व कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला आहे. हे नियम काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत. हॉटेल्स, बार, रेस्टोरंट बंद राहणार असले तरी कोणाचीही गैरसोय होऊ दिली जाणार नाही. होम डिलिव्हरी व पार्सल नेण्याबाबत सूट देण्यात येईल. जर या नियमांचे पालन केले नाही व परिस्थिती आणखी भयानक झाल्यास लॉकडाउनच पर्याय आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे, हे विसरून चालणार नाही,’ अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : राज्यात वीकेंड लॉकडाऊन; तर कडक निर्बंध लागू होणार
- मुख्यमंत्रीसाहेब, जनतेच सोडा आधी मंत्र्यांना आवर घाला; जयंत पाटलांच्या दौऱ्यात नियमांना तिलांजली
- ‘उद्धवसाहेब तुम्ही लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य द्या उद्योग जगत तुमच्या पाठीशी आहे’
- निःशब्द भावनांना बच्चू कडू यांची साथ, राख झालेल्या संसाराला दिला मदतीचा हात
- अशोक चव्हाणांनी केला भाजपचा सुफडासाफ; चिखलीकरांचा गड ढासळला !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

