Share

राज्यात येत्या 6 दिवसात 90 लाख नागरीकांचं होणार लसीकरण; टोपेंनी केली ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेची घोषणा

Published On: 

मुंबई – राज्यात येत्या 6 दिवसात 90 लाख नागरीकांचं लसीकरण करण्याच्या उद्देशानं मिशन कवच कुंडल या विशेष लसीकरण मोहिमेची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल केली. आजपासून 14 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या मोहिमेत दररोज 15 लाख जणांना लसीच्या मात्रा देण्यात येणार आहेत.

राज्यातील सव्वानऊ कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यापैकी सहा कोटी नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं असून आणखी सव्वातीन कोटीपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण शिल्लक आहे. लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

या विशेष मोहिमेसाठी लस देण्यासाठी आवश्यक असलेल्या सिरिंजसह मनुष्यबळ उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी या अभियानात इंडियन मेडिकल असोसिएशन, खाजगी डॉक्टर, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्वयंसेवी संस्था अशा संस्थांसह समाजातल्या विविध घटकांना सहभागी करुन घेणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यातल्या कोविडमुळं मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत दिली जाणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल केली. यासाठी राज्य आपत्ती निवारण निधीमधून 700 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. कोरोनामुळे राज्यातले 1 लाख 40 हजार नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. यासाठी पोर्टलवर जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना माहिती भरावी लागेल. त्यानंतर मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा होतील, असं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!