🕒 1 min read
नवी-दिल्ली : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून(२२ डिसें.) सुरु होत असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. तसेच हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याच्या टीका विरोधकांकडून करण्यात येत आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी नवी-दिल्लीमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना विरोधकांना उत्तर दिले आहे.
यावेळी बोलत असतांना राऊत म्हणाले की,’इतर राज्यांमध्ये काय चाललंय ते पहावं लागेल. केंद्राने सूचना दिल्यात. नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचनांनुसार अधिवेशन होईल. विरोधकांना गोंधळ घालण्यासाठी दिवस वाढवायचे नाहीत, कामाचे दिवस सरकारने ठरवलेत. गोंधळ घालण्यासाठी दिवस देता येणार नाहीत. कामाच्या दिवसात विरोधी पक्षाने त्यांचं काम करावं’, असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान, पुढे भाजप नेते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil)) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) एक दिवस विदेशात जायचं असेल तर चार्ज द्यावा लागतो. पण तुमचा कोणावर भरोसाचच नाही, ज्याच्यावर विश्वास आहे अशा आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्या, असा खोचक सल्ला दिला होता. यावर प्रत्युत्तर देत राऊत म्हणाले की,’तुमच्या सल्ल्याची गरज नाही, तुमच्या सल्ल्यावर राज्य चालत नाही. मुख्यमंत्री सक्षम आहेत, उपमुख्यमंत्री देखील सक्षम आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळ व्यवस्थितपणे काम करतंय हे चंद्रकांत पाटलांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाचं काम करावं.’
महत्त्वाच्या बातम्या
- हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस; विविध मुद्यांवरुन भाजपा ठाकरे सरकारला घेरणार?
- “अमित शहा मस्त असले तरी त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त आहेत”
- ‘शिवसेनेला पोकळ आव्हाने देण्यापेक्षा लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांशी लढून दाखवा’
- चिंताजनक! ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावाने इस्त्रायलमध्ये पहिला मृत्यू
- “एकच गुन्हा महाविकास आघाडी सरकार पुन्हा…”, भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
