🕒 1 min read
नांदेड : राष्ट्रीय महामार्ग महामार्ग क्र. ३६१ मधील भुसंपादनात १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. आयुक्तानी तत्काळ यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत.
नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग ३६१मध्ये ४४० कोटींपर्यंत भूसंपादनाचा मोबदला देण्यात आलेला आहे. मात्र यातील १०० कोटींचा मोबदला शासकीय जमिनींच्या मोबदल्यात देण्यात आला आहे अशी तक्रार शिवसेना नेते व सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. यावेळी या संदर्भात त्यांनी पुरवेही सादर केले आहे. या सगळ्या प्रकरणामुळे तेथील उपविभागीय अधिकारी आणि भूसंपादन प्रक्रियेतील यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या घोटाळ्याप्रकरणी लवकरात लवकर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती जे सत्य असेल ते सर्वांच्या समोर येईल, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले,
नांदेड जिल्ह्यातील २५ गावांमधून हा महामार्ग जात आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात भूसंपादन निवाडे आणि सुनावणी स्थगित करण्यात आली होती. मात्र, स्थगितीनंतरही उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावण्या करुन गैरफायदा घेत शासकीय जमिनी खासगी मालकीत दाखवत मोबदला देण्यात आला आहे अशी तक्रार मारावार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- टीम इंडियानं घाबरू नये, चौथ्या कसोटीसाठी ‘fair pitch’ तयार करावे ; शोएब अख्तरचा सल्ला
- रोहितसह ‘हे’ खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून होऊ शकतात बाहेर
- धक्कादायक! ‘या’ तालुक्यातील शासकीय कार्यालयतील दूरध्वनी बंद; नागरिकांची गैरसोय
- ‘अजित पवार मराठवाडा विदर्भात आले तर त्यांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केले पाहिजे’
- मोठी बातमी : …तोवर राज्यातील घरगुती आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार नाही, अजितदादांची विधानसभेत ग्वाही


