टीम महाराष्ट्र देशा : ‘शिवसेना नरमली, माघार, तडजोड, समसमान पदांची मागणी सोडली वगैर पुडया सुटू लागल्या आहेत,’ असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेविषयी भाजपला लक्ष केले आहे.
‘ये पब्लिक है. सब जानती है. जे ठरले होते त्या प्रमाणेच होईल,’ असे पुन्हा एकदा राऊत यांनी सत्ता स्थापनेविषयी स्पष्ट भूमिका मांडली आहे. तसेच शिवसेना-भाजप युतीमध्ये मुख्यमंत्रीपदाविषयी संभ्रम आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1189601493063753729?s=20
तसेच शिवसेना आणि भाजप एकत्र येण्यातच दोघांचं हित आहे, असं वक्तव्य राऊत यांनी केले होते. ‘जर ठरल्याप्रमाणे सगळं सुरळीत घडलं, तर राज्याचं सरकार ५ वर्ष स्थिर असेल. मुख्यमंत्र्यांना काम करण्याची संधी, स्वातंत्र्य आणि मुभा मिळाली पाहिजे. महायुतीचं सरकार यावं ही आमचीही इच्छा आहे. फक्त गोष्टी ठरल्याप्रमाणे व्हायला पाहिजेत,’ असं राऊत म्हणाले होते.
दरम्यान, भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 13 मंत्रिपदांची ऑफर दिली आहे. तर भाजप स्वत:कडे 26 मंत्रिपद ठेवणार, असा हा नवा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रस्तावात मुख्यमंत्री पद, गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही खाती कोणत्याही परिस्थितीत देण्यात येणार नाहीत, हे भाजपनं स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1189749935668748289?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1189749935668748289?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

