Share

भाजपच्या मतपेढीला सुरुंग लावण्याचे शिवसेनेचे प्रयत्न सुरूच; ‘उद्धव ठाकरे आपडा’नंतर ‘रासगरबा’

Published On: 

मुंबई:- भाजपासोबतची युती तुटल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर खूप मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आतापासूनच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

शिवसेनेने यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे. दरम्यान एका बाजूला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना देखील अमराठी मतांसाठी जोरदारपणे तयारीला लागली आहे.

दरम्यान आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं गुजराती, मारवाडी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी कंबर कसली आहे. येत्या ७ फेब्रुवारीला शिवसेनेनं मालाडमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. यावेळी २१ गुजराती उद्योजक, व्यापारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याशिवाय गुजरातीबहुल भागांमध्ये शिवसेना रासगरबादेखील आयोजित करणार आहे.

मुंबई उपनगरात काही भागांत गुजराती, मारवाडी समाजाचं प्राबल्य आहे. मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये ही मतं निर्णायक ठरू शकतात. या एकगठ्ठा मतांमुळेच मालाड, कांदिवली, बोरिवली भागांत भाजपचं वर्चस्व आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये हे दिसून आलं आहे. त्यामुळे आता या मतपेढीला आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न शिवसेनेनं सुरू केले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!