Share

‘शिवसेना येणाऱ्या पिढीला कोणत्या तोंडाने सामोरे जाणार?’; भाजपचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानसाठी शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर भाजपनेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. ‘ आर्यन खानसाठी शिवसेनेचा नेता सर्वोच्च न्यायालयात गेला असून एनसीबीच्या कामाच्या चौकशीचीही मागणी केली आहे. अमली पदार्थांच्या विरोधी लढ्यात शिवसेनेने ड्रग्स माफियांच्या बाजूने उभे रहाणे दुर्दैवी आहेच. येणाऱ्या पिढीला शिवसेना कोणत्या तोंडाने सामोरी जाणार आहे?’ असा सवाल भातखळकरांनी केला आहे.

शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आर्यन खानच्या सुटकेची मागणी केली आहे. तसेच एनसीबीच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही तिवारींनी केली आहे. किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात ई-मेलद्वारे याचिका दाखल केली असून त्यांची याचिका दाखल करून घेण्यात आली आहे.

एकीकडे तीन हजार किलो ड्रग्ज मिळतात. मात्र मुंबई किंवा बॉलिवूडला धरून एनसीबी बदनामी करत आहे. त्यात काही लॉजिक निघत नाही. एनसीबी ही स्वतंत्र संवैधानिक संघटना असून आपल्या पदाचा गैरवापर करत आहे. आर्यनची केस ही शुल्लक केस आहे. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. आर्यनला २४ तासासाठी अटक करण्यात आली आहे. नंतर त्याला इंटरनॅशनल पेडलर ठरवलं गेलं. मग त्यात इंटरनॅशल रॅकेटही आलं. या सर्व ट्रायलच्या गोष्टी असून त्याला बेल मिळणे हा त्याचा राईट आहे, असे तिवारी यांनी सांगितले. इतरांना जामीन होतो. त्याला १७ दिवसांपासून आत ठेवलं आहे, याकडेही त्यांनी याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!