Share

कोकणातील प्रकल्पावरून कॉंग्रेस-शिवसेना आमने-सामने ; महाविकास आघाडीत रंगला कलगीतुरा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कोकणातील प्रकल्पावरून महाविकास आघाडीत पुन्हा एकदा शीतयुद्ध सुरु झालं आहे.सिंधुदुर्गात होत असलेला आयुष मंत्रालयाचा प्रकल्प मंत्री अमित देशमुख लातूरला नेण्याची मागणी केल्याने महाविकास आघाडीत चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर टीका केली आहे. सिंधुदुर्गाच्या वाट्याला येणारा प्रकल्प पळवून नेण्याच्या प्रयत्नाचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. कोकणातले असे अनेक प्रकल्प पळवण्याचे प्रयत्न झाले आहेत,अशा शब्दात विनायक राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

केंद्र सरकारचा हा प्रकल्प दोडा मार्गावरील आढाळी येथे उभारण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयाने त्याला मंजुरीही दिली आहे. मात्र, अमित देशमुख यांनी अचानक हा प्रकल्प लातूरला हलविण्याची मागणी केल्याने त्याला शिवसेना आक्रमक झाली आहे.

‘अमित देशमुख यांनी केली मागणी ही योग्य नाही. त्यामुळे ही बाब आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणली आहे. त्यांनी यात लक्ष घातले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आयुष मंत्रालयाकडून याबद्दल विचारणा झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प सिंधुदुर्गातच व्हावा अशी आम्ही मागणी केली आहे, असंही विनायक राऊत यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!