टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना नेते खा. संजय राऊत आणि रामदास कदम यांनी आज राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकार स्थापनेत शिवसेना कुठेही अडथळा ठरत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
राऊत म्हणाले की, आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने राज्यपालांना भेटलो. ही आमची सदिच्छा भेट होती. या भेटीत बाळासाहेब ठाकरे यांचे फटकारे हे पुस्तक तसेच उद्धव ठाकरे यांची पाहावा विठ्ठल व गडकिल्ल्यांबाबतचे पुस्तक राज्यपालांना भेट दिले.
या भेटीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवरही चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हायला हवं, असे शिवसेनेला वाटत असल्याची बाब आम्ही राज्यपालांपुढे ठेवल्याचेही राऊत म्हणाले. सरकार स्थापन व्हायला का उशीर होतोय हे माहीत नाही मात्र सरकार स्थापनेत शिवसेनेचा कोणताही अडसर नसल्याचेही आम्ही राज्यपालांना सांगितल्याचे राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1191334614347812870?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191328920634658816?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191323112802926592?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

