Share

‘बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र व मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- सुशांत सिंह मृत्यू प्रकरण सध्या देशभर गाजत आहे. या प्रकरणात योग्य तपास करणाऱया मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी मोठे षड्यंत्र रचले होते. सोशल मीडियावर तब्बल 80 हजार किंवा त्यापेक्षाही जास्त बोगस खाती उघडून त्याद्वारे पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यात आली असल्याचे आता सांगण्यात येत आहे.

बिनबुडाचे आरोप, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून आमचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला, पण आम्ही डगमगलो नाही. आता या बोगस अकाऊंट खोलणाऱयांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करू, असे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठणकावले आहे. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल केले असून बोगस खाती बनविणाऱ्यांचा कसून शोध सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई नक्की केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

दरम्यान, आता या प्रकरणी शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा वापर राजकरणासाठीच केल्याचा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची बदनामी करण्यासाठी उघडण्यात आलेल्या सोशल मिडियावरील बनावट अकाउंटचा लवकरच तपास होऊन सत्य बाहेर येईल असे ते म्हणाले.

एम्सनेदेखील सुशांत सिंहची हत्या नसून आत्महत्या असल्याचे सांगितल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाले. बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजपूत मते मिळवण्यासाठी हे राजकारण केले गेले असा आरोप अनिल परब यांनी केला. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे राज्याचे नेतृत्व केले. पण सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र व मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱयांचा बिहारमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस प्रचार करणार का, असा प्रश्न त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!