🕒 1 min read
चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिंदेगट आणि भाजपाच्या नेत्यांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सातत्याने भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यामुळे भाजपा-मनसे युती होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ५ सप्टेंबरला मुंबईत येत आहेत. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान भाजपा आणि मनसे युतीचा नारळ फुटणार असल्याची चिन्हं दिसून येत आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांना आम्ही मित्र म्हणून भेटायला जातो. राजकीय चर्चेसाठी जात नाही, असंही बावनकुळेंनी म्हटलं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणुक लढेल. भाजपा आणि शिवसेना युती होईल. याआधी इतके यश मिळाले नसेल, त्यापेक्षा जास्त यश या सरकारमध्ये प्राप्त होईल, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- “BJP ला राज ठाकरेंची गरज नाही, नुकसान होईल”, शहांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी केंद्रीय मंत्र्याचा इशारा
- MNS । दसऱ्याला आपण प्रत्येक हिंदूला आणि मराठी माणसाला मार्गदर्शन करावे; मनसैनिकांची राज ठाकरेंना विनंती
- Ashok Chavan | अशोक चव्हाणांनी देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या भेटीचं दिलं स्पष्टीकरण, म्हणाले..
- Ravi Rana | अमरावतीत हत्येच्या घटनेनंतर रवी राणा संतप्त
- Ashok Chavan | अशोक चव्हाण यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट! चर्चेला उधाण, काँग्रेसचे आमदार फुटणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
