मुंबई – पूजा चव्हाण या तरुणीने सात फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते. विरोधकांनी रान पेटवल्यानंतर राठोड काही काळ नॉट रिचेबल झाले होते.
पुढे पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप आणि काही फोटोंमुळे हे प्रकरण राज्यभर गाजलं. यानंतर या प्रकरणामुळे राठोडांना मंत्रिपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं होतं. दरम्यान,आता शिवसेना आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घ्यावे अशी मागणी चांगलीच जोर धरू लागली आहे.
संजय राठोड यांना मंत्री करा, असं म्हणत यवतमाळच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने चक्क यतमाळ ते मुंबई अशी सायकलवारी केली. मुंबईत शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत त्यांनी संजय राठोड यांना पुन्हा मंत्री करा, अशी विनंती पक्षाकडे केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदींच्या दौऱ्याची अपेक्षा करण्यात चुक नाही; मदत उशिरा नको, वेळेवर द्या’
- ‘प्रत्येकवेळी अभिमान वाटेल अशी कामगिरी केली’, प्रियांकाकडून मेरीकोमचं कौतुक
- ‘भिंत बांधावी ही कल्पना, आग्रह नाही’; विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री ठाकरेंच स्पष्टीकरण
- असा राजकारणी पुन्हा होणे नाही, यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले दुःख
- महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

