टीम महाराष्ट्र देशा : ‘मुख्यमंत्र्यांनी नागपूरला क्राईम सिटी अशी नवी ओळख दिली,’ असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. पवार नागपूर येथे सभेदरम्यान बोलत होते.
पुढे बोलताना पवारांनी भाजप सरकारच्या कामाचा लेखाजोखा काढत म्हणाले, छत्रपतींचे स्मारक, इंदू मिलवरचे बाबासाहेबांचे स्मारक अशा सगळ्या प्रकल्पांची कामं रखडली आहेत. एक विटही रचली गेली नाही. काम तर काही केलं नाही मात्र मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवलं, असे पवार म्हणाले.
तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना पुढे पवारांनी कार्यकर्त्यांना आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन केले. आता तुमचे काय हाल करेल याचा विचार करा यावेळी पवार म्हणाले. ‘आम्ही आघाडीच्या काळात खड्डे’मुक्त’ राज्य घडवण्याचा संकल्प केला होता, मात्र या सरकारने खड्डे’युक्त’ राज्य घडवण्याचा निर्धार केलाय. अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले. पण सरकारला लोकांच्या जीवाची पर्वा नाही’, असे पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182515391798505472?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182515021114249217?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182507945453477889?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

