🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले आहेत.या हल्ल्यानंतर आता विरोधकांकडून सरकारवर हल्ले चढवले जाऊ लागले आहेत.देशाचं संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधानांना अपयश आलं असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांनी केली आहे.
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा शरद पवार यांनी निषेध केला. तसेच संपूर्ण देश शहीद जवानांच्या परिवारासोबत आहे, असे विश्वासही त्यांनी दिला. ही वेळ राजकारण करण्याची नाही, असे म्हणतानाच त्यांनी सरकारने खबरदारी घेतली की नाही अशी शंका मात्र उपस्थित केली. ट्वीट करून देखील पवार यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पित केली आहे.
The cowardly attack on a convoy of the CRPF and killing of Jawans in Awantipora, Pulwama district in Jammu and Kashmir is a condemnable act. My condolences to the families of the martyrs who have sacrificed their lives for India.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 14, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

