Share

शरद पवारांना कोरेगाव भीमा प्रकरणात चौकशीसाठी बोलवा ; आयोगाकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : शरद पवार यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी एस.आय.टी. मार्फत करावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. पण केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एन.आय.ए. कडे देऊन एक प्रकारे राज्य सरकारवर कुरघोडी केली होती.

आता एल्गार परिषदेची चौकशी एनआयएकडे देण्यास विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना समन्स बजावावा, अशी मागणी एका व्यक्तीने केली आहे. यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेताच केंद्र सरकारने एल्गार परिषदेचे प्रकरण एनआयएकडे सोपविले होते.

तर एनआयएच्या पथकालाही पुणे पोलिसांनी कागदपत्रे न दिल्याने माघारी जावे लागले होते. अखेर बऱ्याच वादानंतर ठाकरे यांनी एनआयएकडे एल्गार परिषदेची चौकशी देण्यास मंजुरी दिली होती. यावरून शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडताना एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसा ही दोन्ही प्रकरणे वेगळी असून भीमा कोरेगाव प्रकरण कदापीही केंद्राकडे देणार नसल्याचे सांगितले होते.

आता हा वाद शमत नाही तोच एका व्यक्तीने कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे जाऊन शरद पवारांनाच समन्स बजावण्याचा विनंती अर्ज दाखल केला आहे. २०१८ मध्ये हा हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराची चौकशी या आयोगाकडून केली जात आहे. या विनंती अर्जाचे वृत्त एएनआयने दिले आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!