Share

मुंबईच्या महापौरांचा अजब दावा म्हणे यंदा ‘मुंबईत पाणी तुंबलंच नाही !’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या 24 तासात मुंबईत रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई आणि परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं असून तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूकही विस्कळीत झाली आहे. अशातच शहरात पाणी तुंबलंच नाही, असा हास्यास्पद आणि अजब दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.

‘पहाटेपासून धुवाधार पाऊस पडतोय. सकाळी तर पाऊस थांबतो की नाही, असं चित्र होतं. काही भागात पाणी साचलं होतं, पण अद्यापही कुठे पाणी तुंबलेलं दिसत नाही’, अशी प्रतिक्रिया महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे. याचबरोबर, ते म्हणाले, पालिकेनं काम चांगलं केलं आहे, त्यामुळे पाणी साचलं नाही. शहरात ठिकठिकाणी पालिका कर्मचारी आणि अधिकारी तैनात आहेत.

दरम्यान, दादर, लोअर परळ, माहिम, वांद्रे भागात पावसाचा जोर चांगलाच आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा, फोर्ट परिसरात पावसाचा जोर असून, अनेक भागांत ट्रॅफिक जामचे चित्रही दिसत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!