🕒 1 min read
मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. राज्य सरकारकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती.
मात्र, दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता मुंबई, पुण्यासह नाशिक, पिंपरी-चिंचवड व अन्य काही शहरातील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई, ठाणे वगळता उर्वरित राज्यातील ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये प्रत्यक्ष सुरु करण्यास १५ जानेवारी पर्यंत बंदी करण्यात आली होती. शाळा सुरु करण्यासाठी शाळा प्रशासनांनी तयारी देखील केल्याचे समोर आले होते. आता 16 तारखेपासून पुढील आदेश येईपर्यंत मुंबईतील शाळा आणि कॉलेज बंदच राहणार आहे, असे पत्रक मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले आहे.
दरम्यान, उर्वरित राज्यातील 5 वी ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. शाळा सुरु करताना विद्यार्थी आणि शिक्षक यांनी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विषय पंपावर : भाजप नेत्याच्या वाढदिवसानिमित्त चक्क पेट्रोल २ रुपये स्वस्त !
- तब्बल ६५ वर्षांनी निवडणूक, मात्र ग्रामस्थच काय एकाही उमेदवाराने केलं नाही मतदान !
- ‘पंतप्रधान मोदींनी आधी मीडियासमोर येऊन लस टोचून घ्यावी म्हणजे आमचाही विश्वास बसेल’
- राम मंदिर उभारणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोपवला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा धनादेश !
- देशाच्या सर्वोच्च प्रमुखांनीही शपथपत्रात माहिती लपवली होती; पवारांकडून मुंडेंची पाठराखण !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
