🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेच्या आमदारांशी संपर्क साधण्याची कोणाचीही हिमंत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वास शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.
शिवसेना आमदारांशी संपर्क साधण्याची कोणाची हिमंत नाही. संपर्क साधला तरी शिवसेनेचे आमदार फुटणार नाहीत. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचेही आमदार फुटणार नाहीत, असे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. ज्यांच्याकडे सत्ता स्थापनेसाठी लागणारे १४५ हे संख्याबळ आहे त्यांनी जरूर सरकार स्थापन करावे, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. सुधीर मुंनगंटीवारांची गोड बातमी ही शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचीचं असणार आहे. जे ठरले होते ते द्या एवढीच आमची मागणी आहे, असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1192296993588035585?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192293560692797445?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
