टीम महाराष्ट्र देशा : काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पहिली पत्रकार परिषद घेतली. मात्र त्यांनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही. मोदींनी साधलेल्या मौनावर चौफेर टीका होत असताना भाजपचा मित्रपक्ष शिवसेना मोदींच्या बचावासाठी धावून आला आहे.
मौन स्फोटक असते. वायफळ बोलण्यापेक्षा मौनात ताकद असते, अशी प्रतिक्रिया देत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदींच्या पत्रकार परिषदेचे तोंडभरून कौतुक केले आहे.मोदींना जे काही सांगायचे आहे ते त्यांनी गेल्या पाच वर्षांच्या कामतून सांगितले आहे, असं म्हणतभाजप आणि मोदींच्या पाच वर्षातील कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.
कालच्या पत्रकार परिषदेतील मोदींच्या मौनानंतर विरोधकांनी ‘असा’ साधला निशाणा
पंतप्रधानांची पत्रकार परिषद… ‘मौन की बात’ !#PMPressMeet #PMPressConfere
— Raj Thackeray (@RajThackeray) May 17, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ऐतिहासिक व धाडसी पत्रकार परिषदेबद्दल अभिनंदन !
गोहत्या, नोटबंदी, राफेल भ्रष्टाचार, बेरोजगारी या सर्व प्रश्नांना नरेंद्र मोदींनी उत्तरे दिली,
मनातल्या मनात !#ModiFlopPressConference #ModiPressConference pic.twitter.com/g4O6BlDXNN
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 17, 2019
५ वर्षे तोंडात मूग गिळून बसलेल्या पंतप्रधानांनी लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात पत्रकार परिषदेला संबोधित केले. विशेष म्हणजे पत्रकारांच्या एकही प्रश्नाला उत्तर दिले नाही. या शौर्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे हार्दिक अभिनंदन! गिनीज बुक रेकॉर्ड वाल्यांनी आवर्जून नोंद घ्यावी. pic.twitter.com/PLaA5H4JLW
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 17, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

