🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील कायमच याला कोण विचारतय त्याला काय किंमत आहे असे बोलतात प्रदेशाध्यक्ष असुन त्यांना काय किंमत आहे ते ओळखले पाहिजे मला त्यांची कीव येते, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. तसेच आदळ आपट करून वादळी अधिवेशन होत नाही, असं म्हणत भाजपवर देखील निशाणा साधला आहे.
तसेच यावेळी बोलताना संजय राऊत भाजपवर टीका करताना म्हणाले, आदळ आपट करून वादळी अधिवेशन होत नाही. त्यामुळे कसलं वादळ निर्माण करणारे कुठेतरी फुंकर मारता आणि त्यांना वाटतं वादळ आले. विरोधकांनी प्रश्न विचारावे आपण संसदीय लोकशाही मानतो दिल्लीतील राज्यसभेत संसदीय लोकशाहीला किंमत नसेल महाराष्ट्रातील विधानसभेला मोठी परंपरा आहे त्यानुसार विरोधी पक्षाने काम करावे, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
IPL 2022: आयपीएल सुरु होण्याआधीच चेन्नईला मोठा झटका ; दीपक चहर दुखापतीमुळे होऊ शकतो बाहेर
-
State Budget Session 2022 : भाषण न करताच राज्यपाल कोश्यारी निघून गेले; काय होते कारण?
-
“केंद्राची करणी आणि यांची फक्त पाहणी”, आदित्य ठाकरेंना भातखळकरांचा जोरदार टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
