Share

Sanjay Raut | “हे नामर्द सरकार…” ; संजय राऊतांची शिंदे – फडणवीस सरकारवर जहरी टीका

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून राज्यातील वातावरण तापलेलं आहे. अशातच र्नाटकातील बेळगाव येथील बागेवाडी येथे मंगळवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे तणावाच्या भीतीने महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावचा दौरा रद्द केला. यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

संजय राऊत म्हणाले, “शिंदे असतील किंवा फडणवीस, कारभार कुणाच्याही नावाने चालू द्या. महाराष्ट्राच्या अस्मितेचं, सार्वजनिक मालमत्तेचं, जमिनीचं रक्षण करण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. सरकारला एकही दिवस सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही हे त्यांनी मान्य करायला हवं.”

“सीमाभागात २४ तासांपासून सरकारी प्रेरणेनं महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड होतेय, हल्ले होतायत आणि प्रतिकार करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून तुरुंगात डांबलं जातंय. महाराष्ट्र सरकार आहे की नाही?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले, “अशा प्रकारची वेळ यापूर्वी कधी आली नव्हती. दोन मंत्र्यांनी काल शेपूट घातलं. डरपोक सरकार आहे, महाराष्ट्राच्या जनतेची काळजी नाही सीमा कुरतडल्या जात आहेत. हे सरकार नामर्दासारखं बसलेलं आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्राववर असं संकट आलं आहे तेव्हा विरोधी पक्षाने लढाई केली आहे.” तसेच महाराष्ट्राचे लचके सहजपणे तोडता यावे म्हणुन शिवसेनेचे सरकार घालवलं आहे, असा घणाघातही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!